बंद

    अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती

    • तारीख : 30/06/2025 -

    केंद्र हिस्सा (६०%) व राज्य हिस्सा (४०%)

    शासन निर्णय

    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शासन निर्णय क्रं. इबीसी-2008/ प्र.क्र.62/मावक-2 , दि.17 मार्च, 2009

    योजनेचा मुख्य उददेश

    • अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करुण देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणने कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.

    योजनेच्या प्रमूख अटी

    • अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधित सफाईगार, कातडी सोलणे,कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते
    • ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.
    • उत्पन्नची अट नाही.
    • स्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तीना ग्रामसेवक व सरपंच,नगरपालीका मुख्याधिकारी,महानगरपालीका आयूक्त/उपायुक्त/प्रभाग अधिकारी यांचे कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
    • अनु जाती मध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.

    लाभाचे स्वरुप

    • 1 ली ते 2री च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 110 /- व तदर्थ अनुदान रु. 750 /-
    • 3 री ते 10वी च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 110 /- व तदर्थ अनुदान रु. 750 /-
    • 3 री ते 10वी च्या वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 700 /- व तदर्थ अनुदान रु. 1000 /-

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा