बंद

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

    तारीख : 29/06/2025 -

    शासन निर्णय

    1. सा.न्या. शासन निर्णय, 6 जानेवारी 2017
    2. सा.न्या.शासन निर्णय 26 डिसेबर 2024

    योजनेचा उद्देश

    शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमामध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुलामुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणे.

    पात्रतेच्या अटी

    • विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.
    • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहीवासी असावा.
    • शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
    • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गाचा असावा.
    • विद्यार्थ्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
    • विद्यार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक ज्या राष्ट्रीयकृत/शेड्यूल्ड बॅकेत खाते उघडले आहे त्या खात्याशी संलग्न करणे बंधनकारक असेल.
    • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रू. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्या वेळी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची उत्पन्न वार्षिक मर्यादा त्या त्या प्रमाणात लागू राहील.
    • विद्यार्थी स्थानिक नसावा.
    • महानगरपालिकेच्या हद्दीपासून 05 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालयात/ शिक्षण संस्थेत शिकत असलेल विद्यार्थीसुध्दा या योनजेचा लाभ मिळण्यास पात्र असतील.
    • तालुक्याच्या ठिकाणी उच्च् शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम रु. 38000/- प्रति वर्ष येवढी आहे.
    • विद्यार्थी 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच शिक्षण घेणारा असावा.
    • 11 वी मध्ये प्रेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 वी मध्ये किमान 50 टक्के गुण असणे अनिवार्य आहे.
    • 12 वी मध्ये विद्यार्थ्यास किमान 50 टक्के गुण असल्यावर या योजनेचा पुढे पदवी/ पदव्युत्तर शिक्षणाकरीता लाभ घेता येईल.
    • पदवी, पदविका, दोन वर्षापेक्ष्ज्ञा कमी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास सर विद्यार्थ्यास पुढे लाभ घेण्याकरीता किमान 50 टक्के गुण किंवा त्याप्रमाणात ग्रेडेशन असणे आवश्यक आहे.
    • विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
    • या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही.
    • विद्यार्थी महाराष्ट्र राज्यात कोठेही शिकत असला तरी तो ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्याच जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
    अ. क्र. खर्चाचा प्रकार मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम (रु.) इतर महसूल विभागातील शहरे आणि उर्वरित वर्ग क महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम (रु.) इतर जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रक्कम (रु.)
    1 भोजन 32,000 28,000 25,000
    2 निवास 20,000 15,000 12,000
    3 परिश्रण 8,000 8,000 6,000
    4 प्रतिविद्यार्थी एकूण खर्च 60,000 51,000 43,000

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा